Total Pageviews

Sunday, November 2, 2014

भावसंगीतातील नवा प्रकाश..दिवा लागू दे रे...


आर्या आंबेकर ह्या एकेकाळी लिटिल चॅम्प मध्ये चमकलेल्या आवाजात तरुणाईची सूरावट आली आहे. बरोबर पाच वर्षापूर्वी तुझा पहिला अल्बम करण्याचा दिलेला शब्द पाळून संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या पुढाकारातून रविवारी  २ नोव्हेबर २०१४ला यशवंतराव चव्हाण नाटयगृहात दर्दी रसिकांसमोर बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या सौजन्याने पहिला स्वतंत्र अब्लम प्रकाशित झाला...तोही तिचे वडील डॉ. समीर आणि आई व पहिली गुरु श्रुती आंबेकर यांच्या हस्ते...



आजकाल ज्यांच्याकडे क्वालिटी आहे अशा नव्या गायकांचे अल्बम फारच कमी निघतात..मात्र आर्यामध्ये ते कलागुण आहे..म्हणूनच जुन्या पिढीच्या बोरकरांपासून ते  नव्या पिढीचे लोकप्रिय कवी संदिप खरे यांच्या कवीतांमधून निवडक कवीता निवडून हा अल्बम तयार केल्याचे संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी सांगितले..

या सा-या अल्बमचे श्रेय आर्या संगीतकार सलीलदादांना देते...यात एक हिदी गीतही तिने गायले आहे..ते चालीवर लिहले आहे संदीप खरे यांना..ते सादर करताना...तिला हिंदी चित्रपटसृष्टीतली संगीतकार आपल्या चित्रपटामधून संधी देतील अशी आशा सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली..













यातली काही गाणीही इथे सादर करण्यात आली..

या अल्बममधील काव्याविषयी आणि त्या कवींविषयी संदीप खरे आणि कवयित्री अरुणा ढेरे यांनी आपल्या सादरीकरणातून ते भावविश्व रसिकांसमोर नेमके मांडले..

या टप्प्यावर कलावंताला असा आपला सूर लावण्याचे भाग्य लाभणे हि आयुष्यातली फारच सुंदर घटना आहे...









आर्या आंबेकर आपल्या या सीडीतून परिपक्व होत चाललेला सूर कसा खेळविते हे उमजते. तिच्या आवाजाची तयारी आणि भावभावनांचे सादरीकरण खरोखर यातून रसिकांपर्य़ंत आणि नवीन संगीतकारांपर्येत नक्की पोहोचेल अशी आशा आहे.
कार्तिकी गायकवाड....संगीतकार सलील कुलकर्णी यांचेसह आर्या



No comments:

Post a Comment